2020 जुन

शिवनेरीवरील बौद्ध लेणी

सा हि त्या क्ष र 

छत्रपति शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला जुन्नरचा शिवनेरी किल्ला हा सर्वांच्या परिचयाचा.

पण याच शिवनेरी किल्ल्यावर ६० बुद्ध लेणी आहेत.भारतातील सर्वात जास्त लेणी या महाराष्ट्रात आहेत,महाराष्ट्रातील सर्वात जास्त लेणी या एकट्या जुन्नर तालुक्या मधे आहेत आणि शिवनेरी किल्ल्यावर जुन्नर तालुक्यातील सर्वात जास्त लेणी आपल्याला पहायला मिळतात.

आज आपण शिवनेरी किल्ल्याच्या पुर्वे कडील बाजुच्या साखळ दंडाच्या जवळच्या लेणीची माहिती घेणार आहोत. महाराष्ट्रातुन शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी लाखो पर्यटक येत असतात परंतु खुप कमी असे पर्यटक आहेत की जे साखळदंड़ाच्या मार्गाने किल्ल्यावर जातात.लेणी वर जाण्यासाठी खाली साखळदंड ज्या मार्गाने आहे त्या मार्गावर दिशा दर्शक बाण दाखवले आहेत.साधारणता १ तासाची चढाई केल्यावर आपण साखळदंड आहे त्याठीकाणी येउन पोहचतो. त्या इथे एक मोठा लेणी समुह आपल्याला पहायला मिळतो. शिवनेरी गडावर वरती ज्या मोठ्या प्रमाणात पाण्याच्या टाक्या कोरलेल्या दिसतात त्याच प्रमाने या लेणीच्या समोरच पाण्याची टाकी आहे.उन्हाळ्यात सुद्धा या टाक्यां मधे मुबलक प्रमाणात पाणी साठा उपलब्ध आहे यावरून आपण त्याकाळातील जलव्यवस्थापन हे किती उत्तम होते याची जाणीव होते.या टाकी जवलच एक सुंदर लेण आहे,लेणी द्वारा वर सुंदर असे नक्षी काम कोरलेले आहे

आत मधे बौद्ध भिक्खुंसाठी साधना करण्या साठी शैलगृह आहेत. लेणी द्वाराच्या बाजुला अप्रतिम अशी खिड़की कोरलेली आहे. बेडसे लेणी मध्ये पण आपल्याला सुंदर खिड़की पहायला भेटते. या लेणी समुहातिल बहुतेक लेणी या अर्धवट कोरलेल्या दिसतात. या लेणीच्या खालच्या बाजुने पुढे पायवाटेने १५ मिनट चालत गेल्यावर  दुसरा एक मोठा लेणी समुह बघन्यास मिळतो.या लेणी मधे एक मोठे चैत्यगृह कोरलेले आहे. चैत्यगृहाच्या प्रवेश भिंतीवर दोन्ही बाजुला खिडक्या कोरलेल्या आहेत. तसेच प्रवेश द्वाराच्या इथे पायऱ्या सुद्धा आहेत. या लेणीच्या उजव्या बाजुच्या भिंतीवर एक पाली भाषेतील ब्राम्ही लिपितिल शिलालेख कोरलेला आहे.या लेणी साठी कोणी दान दिले याचा उल्लेख त्यात आहे. लेणी प्रवेशद्वारा समोरच्या छताला दोन हजार वर्षां पुर्वीचे रंगकाम केलेले आढळते.आज ते रंगकाम शेवटची घटका मोजत आहेत परंतु जेवढे शिल्लक आहे ते ज्या वेळेस आपण पाहतो तर असे वाटते की आताच कोणि तरी काचेवर रंग काम केले आहे एवढी चकाकी आजही त्या कलेत दिसते. विचार मनात येतो की ज्या वेळेस ते रंगकाम केले गेले असेल त्याचे सौंदर्य किती अप्रतिम असेल.चैत्यगृहा मधे प्रवेश केल्यावर चार खांब दिसतात. आत मधे एक भव्य असा परिपुर्ण चैत्यस्तुप दिसतो,हे चैत्यगृह चौकोनी आहे. याच्या छतालाही रंगकाम केलेले होते,आज त्यातील थोडेच रंगकाम शिल्लक आहे.याची चकाकी सुद्धा अप्रतिम आहे. स्तुपाचा आकार हा खुप भव्य आहे. या स्तुपाला हर्मिका आणि दगडात कोरलेली छत्री सुद्धा आहे की जी छताला जोड़लेली आहे.या स्तुपाची पुजा जेव्हा बौद्ध भीक्खु आणि उपासक करत असतील तेव्हा येथील वातावरण खुप धम्ममय होत असेल यात शंका नाही. बुद्ध स्तुपाच्या सानिध्यात एक विलक्षण शांती अनुभवयास मिळते.या चैत्यगृहा समोर पाहिले असता विस्तीर्ण असा जुन्नरचा परिसर दृष्टीक्षेपात पडतो.अंबा अंबिका लेणी समुह सुद्धा याठीकाना वरून दिसतो.

वंदामी चेतियं सब्ब सब्ब ठानेसु पतीठितं शारीरिक धातु महाबोधि बुद्ध रूपं सकल सदा.

हे चैत्य स्तुपाचे सुर हजारो वर्ष या लेणींमधुन दुमदुमत असतील आणि संपुर्ण भुतलावरील प्राणी हर्षाने उल्हासित होत असतील यात तीळ मात्र शंका नाही.

या चैत्यगृहाच्या बाजुला शैलगृह कोरलेले आहेत.यात दर्शनी भिंतीवर स्तुप कोरलेला आहे याच्या छतालाही रंगकाम केलेल्याच्या खुणा आजही आपल्याला दिसतात. या लेणीच्या बाजुला काही पायऱ्या कोरलेल्या आहेत. आजच्या आधुनिक काळात ज्या प्रमाणे एका मजल्यावरुन दुसऱ्या मजल्यावर जाण्या साठी जीना असतो त्याच प्रमाणे एक जीना कोरलेला दिसतो या जिन्यातुन वरती गेल्यावर आपल्याला एक भव्य लेणी दिसते या लेणीला व्हरंडा आहे दुमजली असलेल्या या लेणी मधुन समोरचे दृश्य अप्रतिम दिसते.

सम्राट अशोक यांनी बुद्ध अस्थि धातुंवर संपुर्ण जंबुद्वीपात ८४००० स्तुप बांधले.स्तुप हे बुद्ध प्रतीक आहे. बुद्ध प्रतीक पुढील प्रमाने होत बोधिवृक्ष,सिरिपाद,स्तुप. बोधिवृक्ष आपल्याला अंबाअंबिका लेणी समुहातिल भुत लेणीच्या प्रवेशद्वारा वर कोरलेले दिसते,तसेच बुद्ध,धम्म,संघ या तीन रत्नांचे त्रिरत्न चिन्ह सुद्धा भुत लेणी मध्ये, अंबा अंबिका लेणी मधे कोरलेल्या शिलालेखाच्या सुरुवातीला तसेच लेन्याद्रिच्या मुख्य स्तुपाच्या हर्मिकेवर कोरलेले आपल्याला पहायला भेटते. एवढ्या विपुल प्रमाणात जुन्नर मधे लेणी आहेत की यावरून आपन हा अनुमान लावतो की दोन हजार वर्षांपुर्वी किती विपुल प्रमाणात भिक्खु संघ येथे वास्तव्य करत असेल आणि त्यांना दान देणारे उपासकही येथे मोठ्या प्रमाणात असतील.

संपुर्ण जंबुद्वीपावर बुद्धांच्या धम्माचे राज होते हे आपल्याला ठाउक आहे.

बुद्धं सरणं गच्छामि

धम्मं सरणं गच्छामि

संघं सरणं गच्छामि

हा ध्वनि हजारो वर्ष या सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात दुमदुमत असेल. लाखो अनुयायी बुद्धाने सांगितलेल्या धम्म मार्गावर आपले जीवन व्यतीत करत आले आहेत.

हा बुद्धांचा धम्म जनमाणसा पर्यंत पोहचवन्याचे प्रमुख केंद्र या लेणी होत्या. हजारो वर्षां पासुन या बुद्धाच्या भारत भुमिला भेट देण्यासाठी अनेक राजे,उपासक येत होते,येत आहेत आणि भविष्यातही येत राहतील.

* * *

Recommended Posts

2024 Hindi kavita ऑगस्ट

उत्तम कोलगावकर : चंद कवितायें

परिचय : उत्तम कोलगावकर मराठी के एक सशक्त कवि है । उनकी कविता प्राय : भाष्यकविता की रूप में सामने आती है । आकाशवाणी में एक अफसर के रूप मे सेवापूर्ति कर वे आजकल नासिक में निवृत्त जीवन जी रहे है । ‘ जंगलझडी ‘ ,”तळपाणी ‘ , ‘ कालांतर ‘ आदि कविता संग्रह उनके […]

सा हि त्या क्ष र 
2024 जुलै प्रेरणा

‘भवरा ‘च्या निर्मितीची कथा : विजय जाधव,अंबड

बहुचर्चित ‘पांढरकवड्या ‘ कादंबरीचे लेखक विजय जाधव यांच्या ‘भवरा’ या कथासंग्रहाच्या निर्मितीमागील प्रेरणा चार वर्षांपूर्वी कोरोनाच्या महामारीने जग हादरून गेले होते. मानव जातीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या एकाकी काळात मी बरीच पुस्तके वाचली, पण यामध्ये प्रसिद्ध लेखक बाबुराव बागुल यांचे ‘सूड’ हे पुस्तक वाचण्यात आले आणि मला हे पुस्तक खूप आवडले. काही लेखकांची […]

सा हि त्या क्ष र 
2025 Hindi kavita कविता जून लेख/ आलेख हिंदी

जड़ों में खोजता पानी और जीवन का स्पंदन~सुरेन्द्र प्रजापति, बोधगया

मैं इन दिनों एक कोमल, हरित तल, नरम, नाजुक मुलायम पर्ण का सहयात्री हूँ । चौंकिए मत; दरअसल बात कर रहा हूँ, मराठी भाषा के चर्चित कवि, लेखक, संजय बोरुडे की; जो हिंदी भाषा के अच्छे जानकार हैं ।

प्रत्यक्षतः उनका हिंदी में पहला कविता संग्रह ‘पर्णसूक्त’ न्यू वर्ल्ड पब्लिकेशन से प्रकाशित होकर आया है । संग्रह की कविताओं से गुजरते हुए मुझे महसूस हुआ कि एक मराठी भाषी संजय बोरुडे साधिकार हिंदी में भी विलक्षण साहित्य रच सकते हैं ।

सा हि त्या क्ष र 
2025 कविता मराठी मार्च

राजाराम बनासकर यांच्या कविता

संक्षिप्त परिचय_________________________प्रा.राजाराम बनसकर.महात्मा जोतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय कळमनुरी.जि.हिंगोली.निवृत्त:२०१२,_विविध स्तरावरील ‘ मराठी साहित्य संमेलनांत सहभाग…_आकाशवाणी, औरंगाबाद परभणी केंद्रावरील कार्यक्रमात सहभाग.._प्रथित यश.. दिवाळी अंक,मासिक, नियतकालिक, दैनिकातून कविता प्रसिद्ध…__’रडका कांदा ‘बालकविता’संग्रह, प्रसिद्ध….पत्ता:प्रा.राजाराम बनसकर.‘घरोटा’ जैन गल्ली.कळमनुरी.जि.हिंगोली.४३१७०२,(९४२१३९१२३०) ************************************************************** राजाराम बनासकर यांच्या काही कविता   १) ‘ ऑल वेल ‘ आता … कांहीच चुकत नाही कुणाचेसगळेच ..कसे..’ऑल वेल’..!जायज…ना जायज…ठरवायचं कुणी…?विनाकारण,काढायची..उणी ..दुणी..? […]

सा हि त्या क्ष र 

Leave A Comment